हल्ली पाऊस म्हटला तर डोळ्यांसमोर प्रश्न चिन्हाशिवाय काहीच दिसत नाही। कधी कोसळून परतीच्या प्रवासाला जाईल कदाचित त्याला सुद्धा ठाऊक नसावे। हळूच वरती ढगांकडे पाहिले तर नेहमी प्रमाणे कापसासारखे शुभ्र। मग कोठून तरी आठवणी मधल्या पावसाची भुरळ पड़ते , नि पाहता पाहता बालपणीच्या गोष्टी नि पाऊस चक्क डोळ्यांसमोर येऊन मस्ती करायला लागते।
अबब....... कसला तो पाऊस , एका पाठोपाठ थेंब पडून त्याची सरी व्ह्यायची नि नव्यानी जमिनीला बिलगायची। त्यात मातीला होणारा तो सुखद आनंद आणि भर पड़ते तो तिच्या गोड़ अश्या सुगंधाचा , मन नि डोळे ते दॄश्य मोठ्या कुतुहलाने अनुभवाचे। मातीचा झालेला चिखल जणू वाटे पावसाळी उटने नाही। छत्री किवा रेनकोर्ट मुद्दामुन घरी विसरायच कारण पावसाचा आनंद घ्यायला मिळायचा त्यात मारलेली शाळेला दांडी , पाऊस तर एक निम्मित असे। त्याचाच आनंद घेत बालपणी ची गाणी गुनगुणायचो "ये ग ये ग सरी , तुझे मडके भरी " , "सांग सांग भोलानाथ " त्या वेळेस भोलानाथ काही बोलायचा नाही, पण शाळेची घंटा मात्र रोज आपल्या वेळेवर वाजल्याशिवाय राहायची नाही , तसे पाहिले तर शाळेचे नि पावसाचे अतुट असे नाते आहे।
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjxTBBEM2p34yOGh-62zL8TDjQkhlnHq6eq5KiMmEBMrGIV-gnlpX_jHJCOtx25L_vLKzDOM4JjHiIDYpRj8GwRH0XmIGpwbSKLst57TzpExntIppVLlZZzsO7tw-ftG_1h0eS4G57Z550/s320/images+%25281%2529.jpg)
वर्गाच्या खिडकी मधे बसून बेधुंद पडणारा पाऊस नि हवेचा गारवा अंगाला शहारे आणून सोडतात ,त्यात कोठून तरी खमंग कांदा भजींचा वास येऊन जिभेला भिडतो। पावसाला अंगा-खांद्यावर घेऊन सगळी थोरली असो वा लहान आपला आनंद द्विगुणा करतात नाही ? नि नकळत पावसाळी कविता लिहायला घेतात
" पावसाच्या सरी पडून गेल्या
मातीला असा गोड़ सुगंध सुटला
एक एक थेंब मनाला भिडू लागला
डोळ्यांना गारवा स्पर्श करुन गेला
हळूच गालांवर केसांचा
लपंडाव सुरु झाला
नकळत मनातून शब्द फुटले
तीच शब्द लिहावेसे वाटले "
अबब....... कसला तो पाऊस , एका पाठोपाठ थेंब पडून त्याची सरी व्ह्यायची नि नव्यानी जमिनीला बिलगायची। त्यात मातीला होणारा तो सुखद आनंद आणि भर पड़ते तो तिच्या गोड़ अश्या सुगंधाचा , मन नि डोळे ते दॄश्य मोठ्या कुतुहलाने अनुभवाचे। मातीचा झालेला चिखल जणू वाटे पावसाळी उटने नाही। छत्री किवा रेनकोर्ट मुद्दामुन घरी विसरायच कारण पावसाचा आनंद घ्यायला मिळायचा त्यात मारलेली शाळेला दांडी , पाऊस तर एक निम्मित असे। त्याचाच आनंद घेत बालपणी ची गाणी गुनगुणायचो "ये ग ये ग सरी , तुझे मडके भरी " , "सांग सांग भोलानाथ " त्या वेळेस भोलानाथ काही बोलायचा नाही, पण शाळेची घंटा मात्र रोज आपल्या वेळेवर वाजल्याशिवाय राहायची नाही , तसे पाहिले तर शाळेचे नि पावसाचे अतुट असे नाते आहे।
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjxTBBEM2p34yOGh-62zL8TDjQkhlnHq6eq5KiMmEBMrGIV-gnlpX_jHJCOtx25L_vLKzDOM4JjHiIDYpRj8GwRH0XmIGpwbSKLst57TzpExntIppVLlZZzsO7tw-ftG_1h0eS4G57Z550/s320/images+%25281%2529.jpg)
वर्गाच्या खिडकी मधे बसून बेधुंद पडणारा पाऊस नि हवेचा गारवा अंगाला शहारे आणून सोडतात ,त्यात कोठून तरी खमंग कांदा भजींचा वास येऊन जिभेला भिडतो। पावसाला अंगा-खांद्यावर घेऊन सगळी थोरली असो वा लहान आपला आनंद द्विगुणा करतात नाही ? नि नकळत पावसाळी कविता लिहायला घेतात
" पावसाच्या सरी पडून गेल्या
मातीला असा गोड़ सुगंध सुटला
एक एक थेंब मनाला भिडू लागला
डोळ्यांना गारवा स्पर्श करुन गेला
हळूच गालांवर केसांचा
लपंडाव सुरु झाला
नकळत मनातून शब्द फुटले
तीच शब्द लिहावेसे वाटले "
Very good...
ReplyDelete